वाढता उत्पादन खर्च आणि मागणीतील घट पाहता, Samsung India ने कठोर पावले उचलली आहेत. कंपनीने होम ॲप्लायन्स आणि टीव्ही डिव्हिजनमधील जवळपास ८० ते १०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, कार्यालयांचे एकत्रीकरण सुरू केले आहे.
रिस्ट्रक्चरिंगची नवी रणनीती
Samsung India ने आता आक्रमक विस्ताराऐवजी 'कॉस्ट कंट्रोल'वर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. याच धोरणांतर्गत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिव्हिजन विभागातील ८० ते १०० महत्त्वाच्या पदांवर कपात करण्यात आली आहे. वाढलेला कच्च्या मालाचा खर्च आणि रुपयाचे घसरलेले मूल्य यामुळे कंपनीच्या नफ्यावर (Margins) मोठा परिणाम झाला आहे.
प्रमुख कारणे:
- इनपुट कॉस्टमध्ये वाढ: मेमरी चिप्सच्या वाढत्या किमती आणि आयातीचा वाढता खर्च.
- मागणीत घट: गेल्या काही महिन्यांत किरकोळ बाजारातील (Retail) ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे.
- कार्यालयांचे एकत्रीकरण: दिल्ली, गुडगाव, रांची आणि पाटणा येथील प्रादेशिक कार्यालयांचे विलीनीकरण करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्मार्टफोन विभागाचे काय?
सध्या तरी स्मार्टफोन विभाग या कपातीपासून दूर आहे, परंतु हा विभागही दबावाखाली आहे. वाढता उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी कंपनीने काही मॉडेल्सच्या किमती ५% ते १०% नी वाढवल्या आहेत. बाजारातील वाढती स्पर्धा पाहता, आता सर्व मदार आगामी दिवाळी सीजनवर आहे.
दिवाळीच्या काळात मागणी वाढली नाही, तर भविष्यात कंपनी आणखी कठोर निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. गुंतवणूकदार आता सणासुदीच्या काळातील सेलवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
